ज्यांनी संस्था मोडून खाल्ल्या त्यांनी शहानपण शिकवू नये
केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांचे पत्रक
कोल्हापूर, दि. १३:
स्व. राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये नियमाचा आधार घेऊन राजे गटाने पोटनियमात बदल करुन जवळपास १२, ५२८ सभासदांना मतदानापासून वंचित तर ठेवलेच. तसेच; षडयंत्र रचून निवडणूक लढविण्याचाही अधिकार हिरावून घेतलेला आहे. मतदारांसमोर जाण्याचे धाडस नसणा-यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. मुळात ही बँक कागलच्या जनतेची बँक असून कागलच्या जनतेला बँकेबद्दल प्रचंड आत्मीयता व स्वाभिमान आहे. असे असताना त्यांच्या छाताडावर कोकणातील सहकार बुडवून सभासदांना देशोधडीला लावणा-या व्यक्तिच्या हातामध्ये बँक देऊन कागलच्या स्वाभिमानाचा अपमान करणा-यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. लोकशाही मार्गाने लोकांच्या समोर जाऊन मते मागण्याचे ज्यांचे धाडस नाही, अशा प्रवृत्ती छत्रपती शाहु साखर कारखाना असेल किंवा स्व. राजे बँक असेल या संस्थेमध्ये नवीन कायदा व पोटनियमांचा आधार घेऊन ही भुमि निक्षत्रीय झाली पाहिजे, अशा प्रवृत्तीने उमेदवार उभे राहू नयेत आणि ज्या कागलच्या सभासदांना मतदानापासून वंचित ठेवणे हा कुठला पुरुषार्थ….?
रु.२०००/- चा शेअर्स असणा-यांनाच मतदानाचा अधिकार दिला आहे. म्हणजे स्थापनेपासून हजारो सभासद ज्यांनी या बँकेमध्ये पहिल्यापासून कर्ज, ठेवी व इतर व्यवहार केलेल्या व बँकेबद्दल आपुलकीच्या भावनेचाच अपमान केला आहे. लोकांच्यामध्ये जाऊन मते मागण्याची ज्यांची हिंमत नाही, असेच लोक सहकार उध्दवस्त करण्याचे काम करत आहेत.
छत्रपती शाहु महाराजांचे नाव काढून दूध संघ, पतसंस्था मोडल्या, त्यांनी दुस-याच्या संस्थेबद्दल बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार त्यांना नाही. म्हणून त्यांनी नैराश्येतून आमच्यावर टिका करण्यापेक्षा स्वत:च आत्मपरिक्षण करावे.
चुकीचा आधार घेऊन ईडी लावणे, तक्रार करणे व नाहक त्रास देणे या प्रवृत्तीला जनतेने मतपेटीद्वारे चोख व स्वाभिमानी उत्तर दिलेलेच आहे. पण; त्याच्यापेक्षा चुकीच्या पध्दतीने ईडी लावणा-या प्रवृत्तीच्या छाताडावर बसून पुन्हा राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये जनतेने बसविले आहे. ज्यांनी चुकीच्या पध्दतीने ईडी लावण्याचा प्रयत्न केले, ज्यांना जनतेने बाजूला फेकण्याचे काम केले त्यांनी आमच्यावर बोलू नये.
बँकेच्या निवडणुकीसाठी पोट नियमाचा चुकीचा आधार घेणा-यांविरुध्द आम्ही योग्य त्या न्यायालयात दाद मागूच. पण; जनतेच्या न्यायालयातसुध्दा आम्ही जाऊन सभासदावर कसा अन्याय झाला हे पटवून देऊ,
असे पत्रक श्री. भैय्या माने, श्री. प्रकाश गाडेकर, श्री. चंद्रकांत गवळी, श्री.नवल बोते, श्री.प्रविण काळबर, श्री.संजय चितार, श्री. सौरभ पाटील, श्री.अजित कांबळे, श्री. इरफान मुजावर, श्री. राजेंद्र गोनुगडे, श्री. दिलीप घाटगे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
